श्रद्धेय नानाजी देशमुख                          श्र. नानाजी देशमुख

समाज नवरचनेसाठी विविध प्रयोग करणारे, राष्ट्रसमर्पित, चारित्र्य-संपन्न, राष्ट्रीय नेतृत्व करणारे, थोर क्रियाशील समाज सेवक.

श्र. नानाजींनी विविध मार्गाने समाजसेवा केली. स्वेच्छेने राजकारणातून खासदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी दीनदयाळ शोध संस्थानची स्थापना केली. या द्वारे देशभरात अनेक समाजोपयोगी प्रायोगिक पथदर्शी कार्य केलेले आहेत. दीनदयाळ शोध संस्थानाच्या माध्यमाने समाजपरिवर्तनाचे प्रयोग उत्तरप्रदेश मध्ये गोंडा, मध्यप्रदेशात चित्रकुट, गुजरात मध्ये अहमदाबाद, व महाराष्ट्रात नागपूर आणि बीड जिल्ह्यात सुरु आहेत.

श्र. नानाजींनी दिलेली चतु:सुत्री युगानुकूल सामाजिक नवरचनेसाठी अखंड मार्गदर्शन करीत आहेत.

चतु:सुत्री:- 1. स्वावलंबन 2. आरोग्य 3. सदाचार 4.शिक्षण